प्रतिनिधी — श्रावणी कामत
लोणावळा — सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही नैसर्गिक सौंदर्याची नगरी आज पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण आहेच तसं एकदम ऐतिहासिक — भांगरवाडी प्रभाग क्रमांक ७ साठी भारतीय जनता पक्षाने माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव आणि लोकप्रिय कार्यकर्ते देविदासभाऊ कडू या दोन्ही मजबूत आणि जनमानसात रूजलेल्या नेत्यांना एकत्र उभं करून शहराच्या विकासाची नवी सुरुवात जाहीर केली आहे.
‘ताई-भाऊ’ जोडी — अनुभव, सेवा आणि जनसंपर्काचा परिपूर्ण मेळ
राजकारणात अनेक वेळा समीकरणं बदलतात, मतभेद निर्माण होतात, परंतु जनतेच्या हितासाठी एकत्र येणं ही खरी नेतृत्वगुणांची ओळख. सुरेखाताईंचा अनुभव, प्रशासनातील परिपक्वता आणि नगरसेवक म्हणून सिद्ध केलेले काम याला देविदासभाऊंची जनसंपर्क जाळं, सामान्य लोकांशी असलेली जवळीक आणि कार्यकर्त्यांशी असलेली मजबूत नाळ जोडली गेली तर हा विकासरथ कुणीही थांबवू शकणार नाही.
शहरात या जोडीच्या उमेदवारीनंतर अक्षरशः नवी ऊर्जा संचारली आहे. नागरिकांच्या तोंडी एकच वाक्य —
“ताई-भाऊ एकत्र आले, म्हणजे लोणावळ्यात विकासाची नवी पहाट उजाडणार!”
लोणावळ्याचे वाढते प्रश्न — आणि नवे नेतृत्व त्याचे उत्तर?
गेल्या काही वर्षांत पर्यटन वाढले, लोकसंख्या वाढली, पण त्यासोबतच शहराच्या समस्या देखील वाढल्या —
-
अरुंद रस्ते आणि वाढती वाहतूक
-
पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटी
-
वाढत चाललेली कचरा समस्या
-
वाढती महागाई आणि रोजगाराच्या संधींचा अभाव
-
शहराच्या विस्तारानुसार चालणाऱ्या नागरी गरजा
