आसाममध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून, आणखी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे यंदाच्या वर्षातील पूरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 31 वर पोहोचली आहे.
गुवाहाटी: आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पुरामुळे आणखी 21 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 5.65 लाख नागरिक या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत.
मंगळवारी मध्यरात्री आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन पूर अहवालानुसार, बिस्वनाथ, चराईदेव, धेमाजी, डिब्रुगड, गोलाघाट, जोरहाट, कामरूप, कामरूप महानगर, कार्बी आंगलाँग, नागाव, शिवसागर आणि तिनसुकिया या जिल्ह्यांतील 5 लाख 64 हजार 600 हून अधिक नागरिक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत.