एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा.

संयुक्त पाहणीद्वारे बुजविलेले व अतिक्रमित नाले ओळखूनआवश्यक उपाययोजना करण्याचे दिले निर्देश
पिंपरी, दि. १३ एप्रिल २०२६ – एमआयडीसी परिसरातीलनाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि बुजविण्याच्या प्रकारांमुळे नैसर्गिक जलप्रवाहबाधित होत असून पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे एमआयडीसी वमहापालिका अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करूनअतिक्रमित व बुजविलेले नाले तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी. ज्या ठिकाणीशक्य आहे तेथे नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करावी किंवा पर्यायी व्यवस्थाकरावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीयांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील नाल्यांचीसद्यस्थिती, त्यावरील अतिक्रमणेतसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा सखोल आढावाघेण्यासाठी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, उप आयुक्त अण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजयकोतावाड, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे,अतुल पाटील, पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान एमआयडीसी परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेचे सध्याचे स्वरूप, अडथळे आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्यानकाशांमध्ये दर्शविलेले अनेक नाले कंपन्यांकडून बुजविण्यात आले आहेत किंवा त्यावरअतिक्रमण करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणांमुळे नैसर्गिकजलप्रवाह अडथळित होत असून, पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि उद्योग तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामनाकरावा लागतो. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी आणिसंबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करून एमआयडीसी परिसरातीलबुजविलेले किंवा अतिक्रमित नाले तसेच पाणी साचणारी ठिकाणे तात्काळ ओळखून त्यांचीनोंद घेण्यात यावी. शिवाय, जुन्यानाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामेहाती घेणे गरजेचे असून, ज्या ठिकाणी ते शक्य नाही तेथेपर्यायी स्वरूपात स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, जलनिस्सारणमार्गांवर अतिक्रमण करणे ही गंभीर बाब असून यामुळे संपूर्ण परिसराच्या सुरक्षेलाधोका निर्माण होऊ शकतो. नाल्यांवर अतिक्रमण केलेल्या किंवा नाले बुजविलेल्याकंपन्यांनी अतिक्रमण काढून नाले पूर्वस्थितीत आणण्याबाबत कळविण्यात यावे. तसेचआगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सुरळीतठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेळेत काम करण्याचे निर्देशहीआयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले