मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, “जगात भारताची नवी ओळख निर्माण करणारे, दूरदर्शी नेते, भारतमातेचे थोर सुपुत्र, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना महाराष्ट्रवासियांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
फडणवीस म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारत आज जागतिक पटलावर अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सशक्त देश म्हणून ओळखला जात आहे. त्यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाने समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सामावून घेतलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले निर्णय, जसे की डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत अभियान, यामुळे केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेतच नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला आहे.
“मोदीजी हे केवळ पंतप्रधान नाहीत, तर ते जनतेचे सेवक आणि भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. त्यांचा वाढदिवस हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत नव्या युगाकडे वाटचाल करत आहे,” असे फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.