भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. या कारवाईचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मुनीर यांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यांची जागा जनरल शमशाद मिर्झा हे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काश्मीरविषयी भडकाऊ वक्तव्ये आणि दहशतवादी कृत्यांची मालिका
असीम मुनीर यांनी गेल्या काही महिन्यांत काश्मीरविषयी केलेली भडकाऊ भाषणं आणि भारतविरोधी वक्तव्यं यामुळे भारतात रोष होता. विशेषतः पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय, मुनीर हे खालील दहशतवादी घटनांचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे:
-
जानेवारी २०२३: राजौरी येथील दहशतवादी गोळीबार
-
एप्रिल २०२३: भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला
-
जून २०२४: वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या भाविकांच्या बसवर हल्ला
-
ऑक्टोबर २०२४: सोनमर्ग बोगद्यात मजुरांवर दहशतवादी हल्ला